पावित्र्य हरवले

सरत चालली गोडी पेढ्याची
कडसर झाली चव दुधाची
रुक्ष वाटते नवनीत  अन
तीक्ष्ण भासते धार तुपाची    II१II

भेसळ नैवेद्यात झाली
पावित्र्य हरवले प्रसादाचे
पैसा वरचढ आस्थेला
धिंडवडे भक्ती भावनेचे    II२II

चिंतीत गाय  दत्तगुरूंची
आणि गोधन श्रीकृष्णाचे
नाराज महिष यमराजाचा
मन उदास पशुपतीच्या नंदीचे   II३II

पशुपालन म्हणती तयाला
हा तर संस्कृतीचा गो वेद
जोवर नाही सन्मान तयाचा
गोमाता निरर्थक शब्द          II४II

Similar Posts

  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...
  • जागेचं महत्व

    आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व आता जास्त जाणवू  लागलंय योग्य जागेवर असणारे म्हणजे भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय जमीन भिजतेय रक्तानं रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II इकडे पाऊस…

  • किमया

    किमया वैशाखातील संध्या होती संधिप्रकाश विरत होता मावळतीवर खिन्न लालिमा विझण्या आधी रेंगाळत होता II१II क्षितिजावरचा निरोप सोहळा मेघांनी आच्छादित होता मावळतीला धीर द्यावया शुक्र पिवळसर तेवत होता II२II दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या गर्द, स्तब्ध...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *