पुनः अनुभव

नच आठवते नक्की केंव्हा
असाच अनुभव आला होता
असाच होता प्रवास तेंव्हा
सौम्य ताप अन सौम्य आर्द्रता II१II

स्पर्श होई क्षितिजास दृष्टीचा
खुलून दिसे प्रत्येक रंग
सुखद वाटे संपर्क हवेचा
जसे जिभेला खाद्य खमंग II२II

तिरके कोवळे किरण उन्हाचे
उजळले शेत पाचूच्या छटांचे
उभवून गुच्छ सरळ पानांचे
ऊस झेलतो कण ऊर्जेचे II३II

नभाच्या निळाईस नक्षी खडीची
भुरे पांढरे कापसाचे ढिगारे
टिपया तजेला, लज्जत क्षणांची
हवा स्तब्ध झाली, स्थिर झाले वारे II४II

दूर कुठेसे साग वृक्ष ते
पुष्प -तुऱ्यांचे आले भरते
फुल तयाचे जणू लाजते
हिरवाईतच लपु पाहते II५II

कुठे उतावीळ सोनमोहर तो
सर्वां आधी हळू मोहरतो
निरोप घेण्या नाखूष दिसतो
गुलमोहर तो अजून फुलतो II६II

कुठे सुबकश्या घराभोवती
गायी, वासरे निवांत चरती
जसे आरसे तश्या चमकती
स्वच्छ घरांची छपरे, भिंती II७II

असतील अनेक दशके सरली
देखावा परि तसाच दिसतो
कांही क्षण स्थळ, काळ परतली
मी ही तन्मय बालक होतो II८II

-सुरेश गोपाळ भागवत, १४/१०/२०२४.

Similar Posts

  • जागेचं महत्व

    आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व आता जास्त जाणवू  लागलंय योग्य जागेवर असणारे म्हणजे भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय जमीन भिजतेय रक्तानं रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II इकडे पाऊस…

  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...
  • बियांनो दम धरा

    बियांनो दम धरा पडलेल्या बियांनो उगवण्याची करू नका घाई हा पाऊस आहे अवकाळी तुमच्या उपयोगाचा नाही आलंय वादळ तौते घालतंय थैमान डोकं बाहेर नाही काढायचं पडून राहायचं गुमान हा कसला पाऊस, हा तर पाण्याचा प्रपात...
  • किमया

    किमया वैशाखातील संध्या होती संधिप्रकाश विरत होता मावळतीवर खिन्न लालिमा विझण्या आधी रेंगाळत होता II१II क्षितिजावरचा निरोप सोहळा मेघांनी आच्छादित होता मावळतीला धीर द्यावया शुक्र पिवळसर तेवत होता II२II दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या गर्द, स्तब्ध...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *