तू हो ज्योत दिव्याची

ध्येयापायी आयुष्याची कुणी “केली माती”
त्या मातीतून घडली कुठेतरी इवलीशी पणती II१II
परिस्थितीच्या घाण्यामध्ये कुणी रगडले गेले
त्यांच्या रक्त स्वेदाचे जाळाया इंधन झाले II२II
मेहनत करताना कुणाची आतडी पिळवटली
कष्टाचे ते तंतू लपेटून वात की हो वळली II३II
संकटांशी देता टक्कर पडले स्फुल्लिंग
दीप प्रज्वलनासाठी सारा जमलासे योग II४II
ज्यांचे त्यांनी केले, आता तू हो ज्योत दिव्याची
मूकपणे “ते” वाट पाहती इतिकर्तव्यतेची II५II
– सुरेश गोपाळ भागवत (०५/९/२०२४).

Similar Posts

  • अशी उसनवारी नको

    अशी उसनवारी नको जयकरांची पिंकी आणि रेडकरांचा वरुण एकमेकांना ओळखत होते दोन वर्षांपासून वरून होता विशीत आणि पिंकी असेल अठराची कॉलेज मधे त्यांची नेहमी गाठ पडायची एके दिवशी वरुणने तिला व्हिडिओ पाठवला सुंदर कवितेत प्रेमाचा...
  • किमया

    किमया वैशाखातील संध्या होती संधिप्रकाश विरत होता मावळतीवर खिन्न लालिमा विझण्या आधी रेंगाळत होता II१II क्षितिजावरचा निरोप सोहळा मेघांनी आच्छादित होता मावळतीला धीर द्यावया शुक्र पिवळसर तेवत होता II२II दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या गर्द, स्तब्ध...
  • जागेचं महत्व

    आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व आता जास्त जाणवू  लागलंय योग्य जागेवर असणारे म्हणजे भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय जमीन भिजतेय रक्तानं रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II इकडे पाऊस…

  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *